मेढा - येथील भाजपा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्यात बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले, वसंतराव मानकुंबरे, ज्ञानदेव रांजणे , सौरभ शिंदे , पांडुरंग जवळ, कांतीभाई देशमुख व पदाधिकारी
कार्यकर्ता ही माझी ताकद त्यांच्या ताकदी वर विजय निश्चित-आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले
वसंतगडावर जावलीच्या कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
गेल्या पाच वर्षात फक्त आणि फक्त विकास कामे केली त्यामुळे आता विकास कामावर जास्त काहीही बोलणार नाही. कार्यकर्त्यांनीच निवडणुक हाती घेतली असून,माझी ताकत तुम्ही सर्वजण आहात,त्यामुळे विजय निश्चित असून सध्याची अनुकूल परिस्थिती असली तरी कोणीही गाफिल राहू नये,आपण आपल्या आयुष्यातील पहिली निवडणुक लढतोय या पद्धतीने आपण लढायचं आहे,लोकशाहीत ज्याला कुणाला उभ राहायचं त्यांना मी अडवणार नाही, मात्र त्यांनी एकच लक्षात ठेवावे की मी माझ्या मतदार संघातील चांगल्या वाईट घटनामध्ये गेली पाच वर्षे जनते सोबत आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना वापरून सोडून देण्याची माझी वृत्ती नाही, वेळ आली की माझ्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी मी उभा असतो,असे प्रतिपादन आ शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी केले.
मेढा येथील वसंतगडावर भाजपाच्या नियोजन बैठकीवेळी ते बोलत होते . यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुंबरे,जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे,विकास देशपांडे,हणमंतराव पार्टे, एकनाथ रोकडे, पांडुरंग जवळ, कांतीभाई देशमुख, मच्छिन्द्र मुळीक,प्रकाश भोसले, तुकाराम धनावडे,मोहनराव कासुर्डे, रविंद्र परामने,श्रीहरी गोळे,वीरेंद्र शिंदे, गीता लोखंडे, निर्मला दुधाणे , संदीप परामणे , मच्छिन्द्र क्षीरसागर,हिंदुराव तरडे, शिवाजीराव मर्ढेकर, अजय शिर्के, यांच्यासह तालुक्यातील सर्व गावचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,यावेळी बोलताना आ शिवेंदरसिंहराजे भोसले म्हणाले, राजकारणात होत्याचे न्हवते व्हायला वेळ लागतं नाही त्यामुळे नुसतं मतांधिक्याची चर्चा नको तर जनते पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, तालुक्यातील विरोधकांनी काम न करता फक्त लक्ष पदावर ठेवले त्यांना काम करायची इच्छा नाही, तालुक्यात कसल्याही प्रकारचा प्रकल्प उभा रहावा अशी कोणतीही यांची इच्छा नाही, ज्या कोणत्या कारखान्यासाठी शेअर्स गोळा केले त्याचा काहीच हिशोब नाही आशा लोकांना आता स्वप्न पडू लागली आहेत, असा टोला माजी आमदार सदाशिव सपकाळ यांचे नाव न घेता शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला,
वसंतराव मानकुंबरे यावेळी बोलताना म्हणाले, कोट्यावधी रुपयांची कामे जावळी तालुक्यात जर आपल्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहेत तर त्यांना विक्रमी मतदान केलेच पाहिजे,कोणताही उमेदवार येऊ दया विजय आपला आहे, जनतेत जाऊन सांगा मोठ्यामताधिक्याने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवडून द्यायचे आहे, आता वेळ घालवू नका,या महाराष्ट्रात सर्वाधिक मताने शिवेंद्रसिंहराजे निवडून आले पाहिजेत हि आपली जबाबदारी आहे.
ज्ञानदेव रांजणे बोलताना म्हणाले, काम होणार नाही असा एकही शब्द बाबाराजेंच्या डिक्शनरीत नाही, प्रत्येक सर्वसामान्य माणसाचे काम जागेवरच करून त्याला मोकळ्या हाताने कधी त्यांनी पाठविले नाही त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे आपले आमदार असल्याचे सौभाग्य आपल्याला लाभले आहे,कोणीही कसल्याही आदेशाची वाट न पाहता आता कामाला लागून विक्रमी मताधिक्य देऊ .
दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून ज्यांची खरी ओळख आहे,ज्यांनी खऱ्या अर्थाने जावळीच्या विकासात योगदान दिले गावोगावीचा विकास साधला असे आपले जिवाभावाचे असणारे राजे आ.शिवेंद्रसिहराजे भोसले यांना समर्थ साथ देऊन जिल्ह्यात नव्हे तर राज्यात देखील मोठ्या विक्रमी मताधिक्याने निवडून देण्यासाठी जावळीच्या वसंतगडावर झालेल्या भाजपाच्या नियोजन बैठकीवेळी जावळीकरांनी शपथ घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला,
यावेळी केसकरवाडी येथील सरपंच व युवक यांनी आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला तर मेढा नगरीतील कार्यकर्त्यांनी देखील शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विकास कामाकडे पाहून भाजपा मध्ये प्रवेश केला