काटवली - ठाणे बससेवा सुरू ; काटवली येथून बसचा शुभारंभ

0

 


काटवली : काटवली - मुंबई या नव्या गाडीचा शुभारंभ करताना सरपंच मीनाक्षी बेलोषे, संदीप पवार, अविनाश दुर्गावळे ,अशोक सरकाळे, व इतर 


काटवली - ठाणे बससेवा सुरू ; काटवली येथून बसचा शुभारंभ

पाचगणी : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
 मेढा-काटवली मार्गे ठाणे बससेवेचा शुभारंभ काटवली येथे नुकताच करण्यात आला . यावेळी परिसरातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत या गाडीचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. 

    यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदिप पवार, मनसे तालुका अध्यक्ष अविनाश दुर्गावळे , सामाजिक कार्यकर्ते अशोक सरकाळे, काटवली सरपंच मीनाक्षी बेलोशे, महेंद्र सपकाळ, माजी सरपंच मधुकर बेलोशे,साहेबराव गोळे, बबनराव शिंदे, कुमार बेलोशे, ज्ञानेश्वर रांजणे, राजेंद्र बेलोशे,  जयवंत बेलोशे, विक्रम पोरे, तसेच ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती. 
प्रारंभी सरपंच सौ बेलोशे यांनी गाडीचे पूजन केले. तर  चालक आणि वाहक ओमकार घोलप व संभाजी निकम यांचा यावेळी शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तर या नव्या गाडीचे प्रथम प्रवासी म्हणून प्रसाद रांजणे, शिला दुर्गावळे हे ठरले. 

राज्य परिवहन मेढा आगारामार्फत मेढा, काटवली, करहर, हुमगांव, कुडाळ, पाचवडमार्ग ठाणे अशी ही धावणार आहे. सदर बसची सुटण्याची वेळ मेढा येथून सकाळी.०५.०५, काटवली येथे सहा वाजता व ठाणे येथे पोहचण्याची वेळ.१२.३०, तसेच ठाणे येथुन पुन्हा निघण्याची वेळ ही  १४.०० अशी राहणार आहे. 

या परिसरातून अनेक प्रवाशांना पाचवड येथे जाऊन बस पकडव्या लागत होत्या. यासाठी आम्ही मागणी करून पाठपुरावा केला. आगारप्रमुख यांनी तातडीने दखल घेवून ही काटवली - ठाणे गाडी आजपासून सुरू केली आहे या  नव्या बस सेवेचा लाभ जास्तीत जास्त प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन यावेळी संदीप पवार यांनी केले.
सरपंच मीनाक्षी बेलोशे यांनी सांगितले मुंबई पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना ही बस सेवा आपुलकीची सेवा ठरावी असे सांगितले. जावळी कराना अशा सेवा मिळवण्यासाठी आंदोलने करावी लागतात. हे दुर्दैव आहे. ही सेवा म्हणजे विकासाचा सेतू असल्याचे सामजिक कार्यकर्ते अशोक सरकाळे यांनी सांगितले.  

या बस मुळे या परिसरातील मुंबईला जाणाऱ्या चाकरमानी आणि प्रवाशांना चांगली सोय होणार आहे. गेली पंधरा वर्षापूर्वी या परिसरातील दापवडी - मुंबई ही बस सुरू होती ती बंद केल्यानंतर पुन्हा बस नव्हती त्यामुळे या गाडीमुळे  प्रवाशांची सोय होणार आहे. 

करहर परिसरातून खंडाळा, शिरवळ, पुण्याला व मुंबईला जाण्यासाठी थेट गाडी नव्हती त्यामुळे संदीप पवार यांनी ही मागणी लावून धरली आणि मेढा आगाराशी संपर्क साधून चर्चेअंती ही बस सुरू केली याबद्दल त्यांचे या परिसरातील नागरिकांनी आभार मानले. 



Post a Comment

0Comments
Post a Comment (0)