पांचगणी : जतिन देसाई यांना पुरस्कार प्रदान करताना मयूर व्होरा शेजारी शिवाजी राऊत व इतर
ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांना म. गांधी शांती सद्भावना पुरस्कार प्रदान ; जगातील वाढता वंशवाद, हिंसा आणि द्वेष रोखण्यासाठी गांधीजींच्या शांती सदभावाचा मार्ग स्वीकारण्याची गरज : देसाई
पांचगणी : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
जगातील अनेक राष्ट्रांमधील नेल्सन मंडेला, मलाला, मार्टिन ल्युथर किंग ,आईन्स्टाईन या सर्वांनी गांधींचा मार्ग स्वीकारल्याशिवाय जगाला पुढे जाता येणार नाही हे अनेक वेळा सांगितले आहे. याचे महत्त्व भारतीयांनी ओळखून सरहद्द गांधी ही गांधी विचाराची महान व्यक्ति स्वातंत्र्यलढ्यात होती. त्यांचा विचार जागर, शांती सदभावासाठी पुन्हा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांनी केले.
पांचगणी ( ता. महाबळेश्वर ) येथे महात्मा गांधी स्मारक समिती, नगरपालिका, सह्याद्री पत्रकार संघ यांचे वतीने आंतरराष्ट्रीय नीती अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांना महात्मा गांधी शांती सद्भावना पुरस्कार उद्योजक मयूर व्होरा यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी श्री देसाई बोलत होते. यावेळी उद्योजक मयूर व्होरा, ज्येष्ठ पत्रकार समीर मणीयार, विचारवंत सुबोध मोरे, प्रबोधन ज्योतीचे संपादक प्रसाद कुलकर्णी, प्राचार्य शिवाजी राऊत, किशोर भाई पुरोहित आदी उपस्थित होते.
पत्रकार समीर मणियार यांनी सांगितले की महाराष्ट्र अशांत करण्याचे राजकारण्यांच्या मदतीतून चाललेले प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. शांती सद्भाव निर्माण करण्यात आपण सर्व कमी पडलो आहोत. द्वेष वाढवला जातो आहे. जाती धर्मांच्या संघर्षाची बीजे पेरली जात आहेत.
सुबोध मोरे आपल्या भाषणात म्हणाले की ठोकळेबंद प्रचाराचे मार्ग बंद करून कला नाटक चित्रपट पथनाट्य चित्रकला या माध्यमातून गांधी विचार शिक्षण क्षेत्रात सर्व दूर पोहोचवला पाहिजे.
प्रबोधन ज्योती मासिकाचे संपादक पत्रकार प्रसाद कुलकर्णी यांनी घनाघाती भाषणात सांगितले उघड उघड मुलतत्ववाद्यांना, सनातन वादी लोकांना आव्हान देण्याची गरज आहे. गांधी सनातनवादी नव्हते गांधी हिंदू होते असे म्हणत होते पण गांधींचा धार्मिक वाद हिंदूवाद हा आहिंसक सत्य आचरणाचा होता. गांधी आयुष्यात देवळात जाऊन धर्मश्रद्धेचे अवडंबर करीत नव्हते. असे सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष अरूण शेळके, दीपक चिकने गुरुजी, गणेश कदम विक्रांत पवार , विजय भोसले, अस्लम तडसरकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवर वक्ते यांचा गौरव जिल्हा स्मारक समितीच्या वतीने गौरव चिन्ह देऊन किशोर पुरोहित, विक्रांत पवार, रविकांत बेलोसे, सचिन भिलारे , गणेश कदम यांचे हस्ते करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक रविकांत बेलोशे यांनी केले. सूत्रसंचालन महात्मा गांधी स्मारक समितीचे सचिव कॉम्रेड अस्लम तडसरकर यांनी केले तर विक्रांत पवार यांनी आभार मानले.
गांधी परिसंवादातील मान्यवरांचे विचार
* राष्ट्रीय एकात्मता हे गांधीजींचे निरंतर स्वप्न होते. त्यांचे विचार प्रत्येक कृतीतून रुजवण्याची नितांत गरज
*अनुयुद्धच्या भीती खाली सगळे जग वावरत आहे. वैज्ञानिक प्रवास हा हिंसेच्या जवळ चालला आहे हा रोखायचा असेल तर गांधी विचार गरजेचे .
*सद्भावाचा विचार संपवू पाहणाऱ्या सगळ्या प्रवृत्ती आणि संघटनांच्या विरुद्ध निर्भयतेने जागर गरजेचा
*लोक माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा समाज विघटित करतो आहे. देशातील शांततेचा वारसा ऐक्याचा वारसा नष्ट करून सत्तेची लूट चालवली जाते आहे.
* सर्व मतभेद बाजूला ठेवून गांधी हा समान विचाराचा धागा हा देशातील जातीय ध्रुवीकरण धर्मीय ध्रुवीकरण रोखु शकतो.
*गांधी ही राष्ट्र एकात्मतेची शक्ती आहे गांधींना समाज मनातून दृष्टी पटलापासून दूर करण्याचे हेतू द्वेष पसरवणे शत्रुत्व वाढवणे आणि दंगली घडवणे हे आहेत.