गणेशोत्सव कालावधीमध्ये जावळीतून सहा जण हद्दपार - प्रशासनाची कारवाई

0

 


गणेशोत्सव कालावधीमध्ये जावळीतून सहा जण हद्दपार

- प्रशासनाची कारवाई


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -


       सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याकरिता तसेच शांतता व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता जावळी तालुक्यातून तनवीर पठाण, आकाश आगलावे सह चार जण जावळी तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहेत.मेढा पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.


        याबाबत सविस्तर माहिती अशी की सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याकरता तसेच शांतता व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता सुधाकर भोसले प्रांत अधिकारी सातारा यांना मेढा पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील नितीन राजेंद्र लोखंडे राहणार कुडाळ तालुका जावली, तन्वीर हमीद पठाण राहणार जवळवाडी तालुका जावली, मंगेश भरत निकम राहणार करंदी, गणेश विष्णू धनावडे राहणार करंजे, आकाश विठ्ठल आगलावे राहणार बिभवी, व अतुल रमेश खटावकर राहणार कुडाळ तालुका जावली यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करणे कामी १६३ अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता.


       त्या अनुषंगाने तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी ७ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत सदर सराईत आरोपींना हद्दपार केले बाबत आदेश पारित केलेला आहे. त्या अनुषंगाने गणेशोत्सव कालावधीमध्ये सदर आरोपींना मेढा पोलीस ठाणे हद्दीतून १८ सप्टेंबर २०२४ अखेर हद्दपार करण्यात आलेले आहे. अशी माहिती सपोनि पृथ्वीराज ताटे यांनी दिली .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)