केळघर - अपघात विम्याचा धनादेश सोनाली कासुर्डे यांना देताना ज्ञानदेव रांजणे , मोहनराव कासुर्डे , बबनराव बेलोशे , राजेंद्र गहिने , सुर्यकांत चिकणे आदि
खातेदारांनी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा - ज्ञानदेव रांजणे
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने सभासद व शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत . त्याचबरोबर अत्यल्प रक्कमेत अपघात विमा योजना राबविण्यात येत असून त्याचा जास्तीत जास्त कुटुंबाना संकटकाळी मदत व्हावी यासाठी प्रत्येक खातेदाराने अपघात विमा उतरवावा असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी केले .
वरोशी ( ता जावली ) येथील युवक प्रविण कोंडीबा कासुर्डे यांचा दोन महिन्यापूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झाला होता . त्यांचे वारस पत्नी सोनाली कासुर्डे यांना जिल्हा बँकेच्यावतीने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन विमा योजनेतर्गत चार लाख रुपयांचा धनादेश नुकताच जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या हस्ते देण्यात आला . यावेळी ज्येष्ठ नेते मोहनराव कासुर्डे , केळघर शाखेचे व्यवस्थापक सुर्यकांत चिकणे, विकास सोसायटीचे माजी चेअरमन बबनराव बेलोशे , वरोशी सरपंच विलास शिर्के , राजेंद्र गहिने , सुभाष शेलार , जाधव गुरुजी , सुनिल कासुर्डे , प्रदीप कासुर्डे , अक्षय पवार , तेजस कासुर्डे , संतोष शिर्के , ग्राहक उपस्थित होते .
यावेळी शाखा व्यवस्थापक सुर्यकांत चिकणे म्हणाले, बँकेचे सभासद व शेतकरी वर्गाने अपघात विमा काढून घ्यावा . त्यामुळे ऐनवेळी येणाऱ्या संकटात कुटुंबातील व्यक्तींना त्याचा आधार मिळेल . आभार सुर्यकांत चिकणे यांनी मानले .
.