जावली तालुक्यातील तीन जि प गटासाठी ९ तर सहा पंचायत समिती गणासाठी १४ उमेदवार रिंगणात

0

 जावली तालुक्यातील तीन जि प गटासाठी ९ तर सहा पंचायत समिती गणासाठी १४ उमेदवार रिंगणात


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा) -

 जावली तालुक्यातील  जि प गटातील १५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तर  पं स साठी २५ उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने तीन जि प साठी ९ तर सहा पंचायत समितीसाठी १६ उमेदवार रिंगणात आहेत .

     म्हसवे जि.प. गटातून - अशोक रामचंद्र चव्हाण       ,मिलींद रामचंद्र नलवडे - (उबाठा),दत्तात्रय किसन गावडे- - (अपक्ष ) ,सुरेश लक्ष्मण चव्हाण- (अपक्ष ) ,वैशाली दत्तात्रय पांगारे -  (अपक्ष ), यांनी अर्ज मागे घेतले तर  संदीप सर्जेराव पवार -  (शिवसेना), वसंतराव मानकुमरे -  (भाजपा) ,संतोष दिनकर शिराळे-(अपक्ष) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे .

    कुडाळ जि प गटातून -माधुरी प्रविण गोरे- (अपक्ष),स्वप्नाली राहुल ननावरे - (अपक्ष ) ,कल्पना भानुदास फरांदे - (अपक्ष) ,मोनाली महेश बारटक्के- (अपक्ष ) ,प्रसन्ना आशिष रासकर -  (अपक्ष),गीता लक्ष्मण लोखंडे - (अपक्ष ), यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले . तर जयश्री मनिलाल गिरी - (भाजपा), पूनम प्रशांत नायकूडे -  ( राष्ट्रवादी),   जयश्री संजय शेवते -  (अपक्ष) यांच्यामध्ये तिरंगी लढत होईल .

 कुसुंबी जि प गटातून वनिता दिपक ओंबळे - (शिवसेना ) ,माया चंद्रकांत धनावडे  -शिवसेना ( उबाठा ) , उषा सुर्यकांत उंबरकर ( २ )  (अपक्ष ) ,राजश्री वसंत शिंदे ( २ ) (अपक्ष ) , यांनी अर्ज मागे घेतल्याने कविता  एकनाथ ओंबळे  (शिवसेना ) , अर्चना ज्ञानदेव रांजणे  (भा ज पा ), कल्पना गणपत पार्टे   (अपक्ष ) , यांच्यामध्ये तिरंगी लढत होईल .


   तालुक्यात एकूण सहा गण असून यापैकी म्हसवे गणातून प्रतिभा प्रकाश परामणे , नीता निलेश शिंदे , वैष्णवी सुधीर  करंदकर ,पुनम अविनाश दुर्गावळे , अरुणा अजय शिर्के , छाया विलास सुर्वे यांनी अर्ज मागे  घेतल्याने रेश्मा समाधान पोकळे (भाजपा ), शिल्पा मिलिंद शिंदे (राष्ट्रवादी ) , संगीता दिनकर भिसे (अपक्ष) अशी तिरंगी लढत होणार आहे .


खर्शी बारामुरे गणातून विक्रांत महादेव गावडे  शिवसेना (उ बा ठा ) विशात उत्तम सकपाळ - आरपीआय ( आठवले ),श्रीरंग रामचंद्र गलगले - (अपक्ष) , जगन्नाथ भानुदास गावडे -  (अपक्ष ),समीर तुकाराम गोळे ,सुशिल विष्णु गोळे - (अपक्ष ) श्रीहरी तुकाराम  गोळे  ( अपक्ष) ,रविंद्र एकनाथ पार्टे  ( अपक्ष ) , शंकर लक्ष्मण सणस  ( अपक्ष) , यांना अर्ज मागे घेतले तर गोरखनाथ सिताराम महाडिक  - ( भाजपा ) ,विठ्ठल गुलाबराव गोळे  - ( राष्ट्रवादी - (श प ) , किरण हणमंत गायकवाड  ( वंचित बहुजन आघाडी ), यांच्यात तिरंगी लढत होणार आहे .

     कुडाळ गणातून -  वनिता राहुल रोकडे , सोमनाथ लक्ष्मण कदम -  (अपक्ष) ,धनंजय यशवंत केंजळे -  (अपक्ष) ,विरेंद्र सुरेशराव शिंदे - (अपक्ष) यांनी अर्ज मागे घेतला . प्रशांत मारुती तरडे  -शिवसेना (उ बा ठा ) ,राजेंद्र रामचंद्र शिंदे - राष्ट्रवादी ( श प ) , सौरभ राजेंद्र शिंदे -  (भा ज पा ) , राजेंद्र खाशाबा शेवते - (वचित बहुजन आघाडी ) यांच्या मध्ये चौरंगी  लढत आहेत .

सायगांव पं स गणातून रेश्मा संतोष खरात ,  उज्वला जितेंद्र खरात -   (अपक्ष) , वंदना सुहास भोसले -  (अपक्ष ) , वैशाली चंद्रकांत सावंत  ( अपक्ष) यांनी अर्ज मागे घेतले तर     साक्षी विजय देशमुख  - राष्ट्रवादी ( श प ) ,चारुशिला विवेक पवार -  (भा ज पा ) यांच्यामध्ये दुरंगी लढत होईल .

कुसुंबी पं स गणात - सुरेखा संतोष चव्हाण - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) ,वैशाली साधू चिकणे , प्रणाली सुभाष माने,श्रेया समीर चव्हाण  (अपक्ष) , लक्ष्मी चंद्रकांत चिकणे  (अपक्ष) ,राजश्री वसंत शिंदे , (अपक्ष) ,सुरेखा दिलीप शेलार  (अपक्ष ) यांनी अर्ज मागे घेतल्याने  पुष्पा जगन्नाथ चिकणे  (भा ज  पा)  , सुनिता विलास दुंदळे  ( शिवसेना ) यांच्यात दुरंगी लढत होईल .


 आंबेघर तर्फ मेढा गणात -संकेत दिलीप पाटील , जगन्नाथ लक्ष्मण शिर्के यांनी अर्ज मागे घेतल्याने  आतिश संतोष कदम -  (शिवसेना ),विजय बाबाजी सपकाळ (भा ज पा )  यांच्यात दुरंगी लढत होणार आहे . उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून सर्व राजकीय पक्ष , अपक्ष उमेदवारांनी प्रचारासाठी गावोगावी , घरो -घरी सुरुवात केली आहे .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)