केळघर - अभिजित कोळी यांच्या शिवराज्याभिषेक पदयात्रेचे स्वागत प्रसंगी रामभाऊ शेलार , मोहनराव कासुर्डे , शंकरराव बेलोशे, रविंद्र सल्लक , सुनिल जांभळे , बबनराव बेलोशे , विष्णू दळवी, अंकुश बेलोशे ,संतोष कासुर्डे , संजय दळवी , महंमद पठाण , पांडुरंग धनावडे आदि
छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही एका धर्माचे, जाती - पातीचे नव्हते ; हे सुराज्य प्रत्येकाला आपलेसे वाटावे म्हणून त्यांनी समाजात स्वआयत्वाची भावना निर्माण केल्यानेच त्यांच्यासाठी असंख्य मावळे मरायला तयार झाले - युवा व्याख्याते अभिजित कोळी
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
पदयात्रेच्या निमित्ताने जनजागृती करत छ. शिवाजी महाराजांचे विचार पेरत निघालो असताना ऐतिहासिक जावलीच्या खोऱ्यात आल्यावर मोठी प्रेरणा मिळाली . याच परिसरात निष्ठावंत मावळ्यांच्या मदतीने त्यांनी मोठा प्रताप घडवला . छत्रपती कोणत्याही एका धर्माचे, जाती - पातीचे नव्हते . हे राज्य प्रत्येकाला आपलेसे वाटावे म्हणून त्यांनी समाजात स्वआयत्वाची भावना निर्माण केल्यानेच त्यांच्यासाठी असंख्य मावळे मरायला तयार झाले . तुम्ही भाग्यवान आहात अशा पवित्र भूमीत जन्माला आलात . आजच्या पिढीत महाराजांचे आचार विचार रुजविण्यासाठी मी पदयात्रेच्या निमित्ताने युवकांशी संवाद साधत असून समाजातील युवकांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन युवा व्याख्याते अभिजित कोळी यांनी केले .
केळघर ( ता जावली ) येथे युवा व्याख्याते अभिजित कोळी यांच्या कुंडल ( जि . सांगली ) ते किल्ले रायगड या शिवराज्याभिषेक पदयात्रेच्या स्वागत प्रसंगी ते बोलत होते . यावेळी जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक रामभाऊ शेलार , विभागाचे ज्येष्ठ नेते मोहनराव कासुर्डे , केळघरचे उपसरपंच शंकरराव बेलोशे, माजी सरपंच रविंद्र सल्लक , केळघर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुनिल जांभळे , माजी चेअरमन बबनराव बेलोशे , पोलीस पाटील विष्णू दळवी , भाजपाचे तालुका सरचिटणीस अंकुश बेलोशे ,जावली तालुका खादी ग्रामोद्योग संस्थेचे चेअरमन संतोष कासुर्डे , नांदगणेचे माजी सरपंच संजय दळवी , माजी उपसरपंच महंमद पठाण , पांडुरंग धनावडे , सुरेश जंगम , सुनिल बेलोशे ,रामचंद्र बेलोशे आदिंची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी युवा व्याख्याते अभिजित कोळी म्हणाले, जावलीचे खोरे म्हणजे येथे पावला - पावलांवर ऐतिहासिक खुणा या नेहमी प्रेरणा देत असतात . समाजातील जातीपातीतील दरी कमी व्हावी यासाठी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छ . शिवरायांनी सुराज्याची स्थापना केली . त्यांनी आपल्या राज्याभिषेकादिनी सर्व जातीपातीच्या लोकांना स्थान दिले होते हा संदेश देत मी कुंडल ( जि . सांगली ) ते किल्ले रायगड हा २५५ किमीचा पायी प्रवास दि . २७ मे ६ जून करत आहे . यासाठी मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा यांचे सौजन्य मिळत आहे . यावेळी मोहनराव कासुर्डे , रामभाऊ शेलार यांनी आपल्या भाषणातून या पदयात्रेस शुभेच्छा दिल्या .
प्रारंभी प्रास्ताविक संजय दळवी यांनी केले तर आभार मोहनराव कासुर्डे यांनी मानले .यावेळी ग्रामस्थ , युवक उपस्थित होते .