जरांगे - पाटलांच्या शांतता रॅलीसाठी ,
जावलीतून हजारो मराठा बांधव उपस्थीत राहाणार...
मेढा : प्रतिनिधी - ( टिम दृष्टीनामा न्यूज) -
मराठा क्रांती सुर्य मनोज जरांगे पाटील यांच्या सातारा येथील शांतता रॅलीसाठी जावली तालुक्यातून हजारो मराठा समन्वयक व मराठा बांधव उपस्थित राहाणार असल्याचा निर्धार मेढा येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरामध्ये झालेल्या नियोजन बैठकीत मध्ये करण्यात आला.
मराठा क्रांती सुर्य मनोज जरांगे पाटील यांची मराठयांची राजधानी सातारा येथे शनिवार दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वा. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला उपस्थित राहाण्यासाठी सकल मराठा समाज जावली तालुका यांच्यावतीने तालुक्याच्या नियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये तालुक्यातील प्रत्येक गांवा गांवातून हजारो सकल मराठा बांधव उपस्थित कसे राहतील याचे नियोजन करण्यात आले. यावेळी विलासबाबा जवळ बोलताना म्हणाले , निमंत्रणाची व गाडीची वाट न बघ शेतातील कामे एक दिवस बाजूला ठेवून सकल मराठा बांधवांनी आपल्या लेकरांच्या भवितव्यासाठी या शांतता रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले .यावेळी उपस्थित मराठा समन्वयकांनी वेगवेगळ्या सूचना मांडल्या तसेच तालुक्यातील विभाग वार जबाबदाऱ्या वाटण्यात आल्या .
याप्रसंगी विलासबाबा जवळ ,सुरेश पार्टे ,सचिन करंजेकर ,प्रकाश कदम, संतोष वारागडे ,सचिन जवळ संजय सुर्वे, राजेश बेलोशे, पांडुरंग श्रीपती धनावडे ,पांडुरंग धनवडे, बजरंग चौधरी , पुंडलिक पार्टे, संजय कदम, बबन धनावडे, संतोष चव्हाण ,विलास दुंदळे, बजरंग जवळ ,विलास धनावडे, महेश पवार ,संदीप मदने, सुरेश जवळ. इत्यादी उपस्थित होते .
दरम्यान शांतता रॅलीच्या नियोजनाबाबत मेढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी तालुका समन्वयकांची बैठक मेढा पोलीस ठाण्यात घेऊन योग्य त्या सूचना केल्या .त्याचबरोबर तालुक्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला.